शेवगाव : ऊस दरांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि औरंगाबादच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारालेलं आंदोलन चिघळलंय.
शेवगावात आज सकाळपासून अनेक गावांमध्ये टायर जाळून रस्तारोको करण्यात आलाय. पोलीसांनी आधी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचा वापर केलाय. त्यानंतर हवेत तीन राऊंड गोळीबारही करण्यात आला. सौम्य लाठीमारात काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही ठिकाणी टायारही जाळण्यात आले आहेत.