चंद्रपूर :-
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आणि गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीत नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे.सरकारने येथील बंद उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे. ह्या जिल्ह्यातील लोकांचे ,रोजगार व आर्थिक प्रश्न सरकारने सोडवले नाही आणि युवकांच्या हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक नक्षलवादाकडे कसे वळतात, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे असे श्री शरद पवार चंद्रपुरात बोलत होते