गडचिरोली –
आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्या आक्रमणात सैनिक हुतात्मा होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !
३ मे या दिवशी रात्री भामरागड उपविभागातील कोपर्शी आणि पुलनार जंगलाच्या परिसरात १ सैनिक आणि २० पोलीस घायाळ झाले. नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना विशेष अभियान पथकाची बुलेटप्रूफ गाडी भूसुरूंगाच्या साहाय्याने उडवली. यामध्ये सुरेश तेलामी हुतात्मा झाले. या वेळी झालेल्या चकमकीत घायाळ झालेल्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या ३७ बटालियनच्या सैनिकांना रायपूर (छत्तीसगड) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.