चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –
तालुक्यात १७ ग्रामपंचायतची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये तालुक्यातील भिलटेक येथील ग्रामपंचायच्या सरपंचपदी आघाडीच्या परीवर्तन पॅनलचे मनोज राऊत थेट जनतेतुन निवडुण आले. त्यानंतर उपसरपंचपदी परीवर्तण पॅनलच्या आशा शेंडे यांची वर्णी लागली आहे. यासोबतच सरपंचांनी आपला पदभार सुध्दा स्विकारला. तर सदस्यांमध्ये सौ.नंदाताई तायडे, मंगेश तायडे, सौ.आशा शेंडे, संजय जनबंधु, अब्दुल नफिजा राजीक, अंकित कोटांगले यांचा समावेश आहे.
यावेळी ग्राम पंचायत सचिव दांडके , संदिप चौधरी, दिलीपराव तायड़े, हरीभाऊ बाष्टीकर, सुधीर अलोने , सागर चौधरी, अरविंद वघवे, अमोल चौधरी, श्रीधर तायड़े, सचिन चौधरी , पुरूषोत्तम पेरसपुरे, किशोर तायड़े, जनार्दन शेंडे , अशोकराव अलोने , वैभव चौधरी , नंदु तायड़े , सुधाकर वघवे , पद्माकर साखरे , चंदु तायड़े , अब्दुल सादिक , त्र्यंबकराव तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.