अन्यथा मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग ठराव आणणार : खा. श्री  विनायक राऊत

0
597

मुंबई -कोकणातील बहुचर्चित “नाणार” प्रकल्पाची जागा खासदार विनायक राउत यांनीच सुचविली असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला आणि कोकणातील वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत खासदार विनायक राउत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत खुलास मागवला आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प हा केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच येत असून आपले खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माझे आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे नाव घेतले आहे असे खा. विनायक राउत यांचे म्हणणे आहे. मी कोणत्या बैठकीत मागणी केली याबाबत सविस्तर पुरावा मला सादर करावा अन्यथा माझे चारित्र्य हनन केल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव मांडावा लागेल असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.