जनता दरबार हा प्रताप अडसडांचा कौतुकास्पद उपक्रम – आपचे श्री नितीन गवळी यांचे मत

0
720
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

    धामणगाव रेल्वे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी घेण्यात आलेला जनता दरबार हा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांचा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे मत आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक तथा चांदुर रेल्वे माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. या जनता दरबारामध्ये तेथील नागरिकांनी शहर विकासाच्या अधिक सूचना मांडल्यात.
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पंचायत समिती भवन, धामणगाव रेल्वे येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता जनता दरबार मंगळवारी घेतला. यावेळी पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, शिक्षण अशा सर्वच विभागातील समस्या येथील नागरिकांनी लेखी स्वरुपात मांडल्यात व नगरपरिषदेच्या सर्व विभागातील प्रशासकीय यंत्रणा उपस्थित असल्याने ४१ प्रकरणांचा निपटारा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केला. तसेच काही उर्वरीत विकासकामे लवकरच करण्याचे आश्वासन सुध्दा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नागरीकांना दिले. यामुळे धामणगाव रेल्वेतील अनेक नागरीकांचे समाधान झाल्यामुळे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी सुरू केलेला हा जनता दरबार नक्कीच कौतुकास्पद आहे व लोकप्रतिनींकडुन असे उपक्रम अपेक्षीत असल्याचे नितीन गवळींनी म्हटले आहे. सदर उपक्रमाबद्दल नगराध्यक्ष प्रताप अडसड यांना शुभेच्छा देत त्यांनी यापुढेही नागरीकांच्या तक्रारी ऐकुन पक्षपात न करता त्यांना योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा आम आदमी पार्टीचे अमरावती संयोजक तथा माजी न. प. उपाध्यक्ष, चांदुर रेल्वे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातुन व्यक्त केली.