प्रतिनिधी/गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-
परिसरात अवकाळी पावसासह गारपीटीने गहु,हरभरा ,कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
आज झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने सोनारखेडा ,वाकी खोलापूर ,म्हैसपूर ,भालसी, वाठोडा शुक्लेश्वर परिसारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात हरभराचे चांगल्या प्रमाणात आले आहे,
तर शेतात सोंगुन पडलेला हरभरा पावसात सापडला आणि गहु पिकांचे ही नुकसान झाले आहे यामुळे या झालेल्या नुकसानीची प्रशासनाने पाहनी करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गाने केले आहे.