अचलपूर:-
परतवाङा अचलपुर शहरामध्ये दिवसेंदिवस नागरीकांच्या समस्या वाढत असल्यामुळे नगर-उपाध्यक्ष शशिकांतजी जैस्वाल यांच्या नेत्तुत्वात भाजपा नगरसेवकांनी दिले मुख्याधिकारी प्रदिप जगताप यांना निवेदन.
अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील विकास कामे जवळपास पुर्णपणे थंडबस्त्यात गेल्याचे दिसत आहे.शहरात एकही रस्ता चालण्यास योग्य नाही.प्रभाग क्रमांक 8 गोवर्धन विहार,सैतुतबाग या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे,घरकुल वाटपात पि.आर.कार्ड ची अट रद्द करून खरेदी खत ग्राह्य धरावे तसेच आठवडी बाजारमधील झोपडपट्टी वासीयांना घरकुल योजनेत सामावून घ्यावे.रस्त्यावरील फेरीवाल्यावर कारवाई करण्यात यावी,माजी सैनिकांना शासन निर्णयानुसार कर सवलत देण्यात यावी तसेच शिवाजी नगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर विचार न झाल्यास लवकरच आंदोलन करणार असल्याचा ईशारा नगरसेवकांनी दिला यावेळी नगरउपाअध्यक्ष शशिकांतजी जैस्वाल, रिणा जयस्वाल महिला बालकल्याण सभापती,मनोजभाऊ जामनेकर,विक्की सोनपरोते,खुशाल थावानी,अक्षरा लहाने व माधुरी तांबे हे भाजपा नगरसेवक उपस्थित होते*