सातारा |- मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयाने आणखी एक बळी घेतला आहे. सोने-चांदी व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कऱ्हाड तालुक्यात घडलीय. राहुल फाळके असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.
श्री राहुल फाळके यांची शेवटची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
सर्वाना माझा शेवटचा नमस्कार 🙏🏻
जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली …. तेव्हा पासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून GST लागू केला.
त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला.आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले
खूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली
खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले
पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार 1 शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाही
मला कोणाला हि फसवायच नव्हतं
माझा तसा स्वभाव हि नाही
पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे.
आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नये
आणि कोणावर हि कोणतीही कारवाई करू नये
माझ जीवन उध्वस्त झालंय
मला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचं
Alwaida ……🖖🏻
घरातील सर्वांसह …. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप miss करेन
तुमचा
राहुल
आणि सर्वात महत्वाचं …… यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या🙏🏻
कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत पण
श्री उद्धव ठाकरे यांना मन आहे
ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात आणि जेव्हा महाराषष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल
आणि माझी फक्त 1 च विनंती आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावी
हि तुमच्या एका शिवसैनिकांची कळकळीची आणि शेवटची विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻