भाग्यनगर (तेलंगण) येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रा
लाखो हिंदूंचा सहभाग
भाग्यनगर – हिंदू हे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असले, तरी प्रथम त्यांनी सैनिक बनून देश अन् धर्म यांचे रक्षण केले पाहिजे. अखंड हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक हिंदूची आज आवश्यकता आहे. वर्ष २०२३ पर्यंत अखंड हिंदु राष्ट्र होणारच आहे. त्यासाठी प्रसंगी प्राणार्पण करण्यासही मी सिद्ध आहे, असे वीररसयुक्त प्रतिपादन भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षण करणारे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. रामनवमीच्या निमित्ताने २५ मार्चला येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सर्वश्री चेतन जनार्दन, नरेंद्र सुर्वे आणि सतीश कोचरेकर यांसह लाखो हिंदू सहभागी झाले होते.