शिक्षक भरती बाबतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा
बीड: नितीन एस ढाकणे
राज्यात २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनही गेल्या 8 वर्षांपासून शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामध्ये ४ वेळा पात्रता ( TET) तर एक वेळा अभियोग्यता चाचणी ( TAIT) घेण्यात आली. या परिक्षा फक्त घेण्यात आल्या मात्र भरतीबाबत सरकारकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षक भरती बाबतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.