वैश्‍विक शांततेसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका ! – सुषमा स्वराज

0
812

बाकू (अझरबैझान) – वैश्‍विक शांती आणि सुरक्षा यांसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका आहे. तो आपल्या नागरिकांना लक्ष्य करतो. त्यामुळे विकासाचे लक्ष्य साध्य करण्याची क्षमता न्यून करतो, असे विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अलिप्ततावादी देशांच्या १८ व्या मध्यावधी मंत्रीस्तरीय बैठकीत केले. या वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याचीही मागणी केली.