चांदूर रेल्वेः – (शहेजाद खान )
पैशाच्या वादावरून १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. शहरातील या बहुचर्चित हत्या प्रकरणातील सात आरोपींना २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणातील २ आरोपी अजुनही फरार आहे.
मोर्शी तालुक्यातील शिरजगाव येथील पंडित विक्रम पाटणकर (४५) व अमरावती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे गौरव सुरेश तिडके (२७) या दोघांना आरोपी शुभम सिताराम दुबे व त्याच्या साथिदारांनी १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत बेदम मारहाण केली होती. १५ हजार रूपयावरून झालेल्या या वादात उपचारादरम्यान पंडित पाटणकर यांचा नागपुर येथील रूग्णालयात मृत्यु झाला होता. नागपुर पोलीसांनी मृत्युपुर्व बयानसुध्दा नोंदविले होते. गौरव तिडके याच्या तक्रारीवरून या प्रकरणात चांदूर रेल्वे पोलीसांनी २० मार्चला गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात एकुण ९ आरोपींना अटक केलेली आहे. ८ एप्रिलला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर शुभम सिताराम दुबे (२४), पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), चेतन भांकरलाल रॉय(२७), राजा विष्णुपंत राऊत (२४) विजय उपाध्याय (वय ४०) रा.चांदूर रेल्वे व विजय तिवारी (वय ३०) रा. अकोला यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर याच प्रकरणातील राहुल तांडेकर रा. चांदूरवाडी याची पोलीस कोठडी संपल्यानंतर ९ एप्रिलला न्यायालयात हजर केले असता त्यालाही २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापुर्वी सागर पांडुरंग गाढवे (३०) व मनिष रतनलाल उपाध्याय (३०) रा. चांदूर रेल्वे यांना सुध्दा २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. म्हणजेच अटक ९ ही आरोपींना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असुन अजुनही वैभव संजय पांडे रा. चांदूर रेल्वे व रितेश बनारसे रा. अमरावती हे दोन आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय भारत लसंते करीत आहे.