भातकुली मधील गणोजा देवी गावात विहिरीतील गाळ काढताना दोघांचा मृत्यू – 2 जण जखमी

0
786
Google search engine
Google search engine

अमरावती :-

फोटो – फाईल

अमरावती : गावालगत असलेल्या विहिरीतील गाळ उपसत असतांना विषारी वायूमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना ग्राम गणोजा देवी येथे घडला आहे, जखमींवर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, ही घटना अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या भातकुली तालुक्यातील ग्राम गणोजा देवी येथे सायंकाळच्या सुमारास घडली.
यामध्ये ओंकार वानखडे आणि अविनाश बिजवे या दोघांचा मृत्यू झाला तर दीनानाथ बिजवे व राजीव खेडकर गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई भासत असल्याने बंद पडलेली तसेच वापरात नसलेली विहीर स्वच्छ करण्याकरिता हे चार व्यक्ती विहिरीमध्ये उतरले होते.