पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जपण्यास सहकार्य करा – राजे श्री अम्ब्रीशराव आत्राम @rajeambrishrao

0
774
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात साजरा 

गडचिरोली-  राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.

 


महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन सोहळा आज येथे पोलिस कवायत मैदानावर झाला. या प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
विविध धर्म आणि पंथ असणाऱ्या लोकांचे असणारे आपले महाराष्ट्र राज्य अनेक भाषा व परंपरा जपत आहे. राज्यात स्थापनेपासून सामाजिक व आर्थिक न्याय देण्याचे काम सुरु आहे. याचा आपणा सर्वांना अभियान आहे असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.
आज देशापुढे अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने विघटनवादी शक्तीचा उल्लेख करावा लागेल. तसेच देशांतर्गत आपल्या राज्यासह इतर शेजारी राज्यातसुध्दा नक्षल चळवळी मूळे अशांतता निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्याची जबाबदारी ही शासनाची असून ही जबाबदारी समर्थपणे पेलल्या जात आहे. हे करीत असतांना अनेक जवानानी आपले बलिदान दिलेले आहे. त्या जवानांचे या दिवशी स्मरण करुन त्यांना अभिवादन करतो. या चळवळीचा बिमोड करण्यात पोलिस दलाच्या जवानांनी नुकतेच जे शौर्य दाखवले त्या जवानांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. अशा शक्तीचा विमोड करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
राज्याच्या सर्व भागातील जनतेची मने सांधन्याचे त्यांच्यातील ऐक्यभावना वृध्दींगत करण्याचे व महाराष्ट्र राज्य एकसंघ बनविण्याचे कार्य राज्याचे पहिले मुख्यमंत्री व त्यांच्या नंतरच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार आणि त्यांनी अंगिकारलेल्या धोरणानुसार महाराष्ट्राच्या विकासाचा रथ प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीतही या राज्याने अग्रक्रमाचा मान मिळविला असून एक पुरोगामी राज्य् म्हणूनही महाराष्ट्राची देशभर ख्याती झाली आहे. हे राज्य शाहू , फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा अंगिकार करणारा आहे असेही ते यावेळी म्हणाले.

आज प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा सांभाळण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखल्याचा निर्धार आपण करु या. भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबुत केल्यास जगात भारताला अधिक महत्व प्राप्त होईल. या दृष्टिने आपण सतत प्रयत्न करीत राहू. या सर्व बाबीकरीता आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे सांगुन पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वात पालिस जवानांचे महिला व पुरुष पथक आणि होमगार्डच्या पथकानी संचलन केले. सोबतच बॉम्बशोधक पथकानीही यामध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचलन क्रिडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.