चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
शहरातील खडकपुरा येथील गोखे, काळे आणि क्रांति चौक येथील हिवसे अशा तिघांच्या घराला काही दिवसांपुर्वी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरातील सर्व सामान जळाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. ही माहीती मिळताच आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी नुकसान झालेल्या तिन्ही घराची पाहणी केली. नुकसान झालेल्या घरातील परीवारातील सदस्यांसोबत नुकसानाची माहिती जाणून घेवून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे तात्काळ शासकीय मदत देण्याचे आदेश नायब तहसीलदार आणि तलाठी यांना दिले.
यावेळी नगराध्यक्ष निलेश ऊर्फ शिट्टू सुर्यवंशी, कृ.उ.बा.स. सभापती प्रा.प्रभाकर वाघ, उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेवक महेश कलावटे, नगरसेवक बच्चू वानरे, नगरसेवक सतपाल वरठे, नायब तहसीलदार राठोड, तलाठी सुडकेसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.