खापरी येथील नितीन बोरकर यांच्या यश उर्फ साहिल या ११ वर्षीय बालकाचे खंडणीसाठी अपहरण करून निर्घृण खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. न्यायालयानेबुधवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. आरोपीला फाशी होणार की जन्मठेप, याची उत्कंठा लागली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी बुधवारी आरोपी संतोष कालवे याला दोनदा भा.स.वि. कलम ३६४/ए अंतर्गत फाशी तसेच कलम ३0२ अंतर्गत पुन्हा फाशी तसेच कलम २0१ अंतर्गत ७ वर्षांचा कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, या घटनेचे क्रौर्य लक्षात घेता आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत होती.