नेर :- यवतमाळ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अशा टंचाईच्या काळात अनेक ठिकाणी नागरिकांना अशुद्ध पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. तर काही गावांमध्ये पर्यायी जलस्रोत उपलब्ध नाही.
त्यामुळे नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणीच प्यावे लागत आहे. यातच आज नेर तालुक्यातील सोनवाढोणा या गावातील विहिरीमध्ये एक महिला पडल्याने गंभीर जखमी झाली आहे ती सध्या तरी बेशुद्ध अवस्थेत आहे स्थानिक गावात विहिरीवर पाणी भरण्यासाठी प्रचंड भीड आहे त्यातच तोल जाऊन ती महिला विहिरीत पडली.