‘सनातन’च्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी डाव्यांकडे अख्खा नक्षलवाद !’

0
800
Google search engine
Google search engine

सप्टेंबर २०१५ मध्ये प्रकाश आंबेडकर यांचे विधान

सनातनला संपवण्यासाठी नक्षलवाद्यांनी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करून त्याचे खापर सनातनवर कसे फोडले जाईल, हे पाहिले आहे, असेच आता स्पष्ट होते आहे ! सनातन पूर्वीपासून ‘या हत्यांमागे नक्षलवादी आहेत’, हे सातत्याने सांगत आली आहे. त्यामुळे आतातरी पोलिसांनी खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्यासाठी नक्षलवाद्यांची चौकशी करावी !

मुंबई – माओवादी संघटनेच्या ‘सेंट्रल कमिटी’चे सदस्य मिलिंद तेलतुंबडे याने कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी आता अटक केलेल्या रोना विल्सन याला पूर्वी पाठवलेल्या पत्रात काँग्रेस, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, गुजरात येथील आमदार जिग्नेश मेवाणी, जेएन्यूमधील विद्यार्थी नेता उमर खलिद यांच्याविषयीचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या नावामुळे त्यांनी सनातनच्या विरोधात नक्षलवाद्यांविषयी सप्टेंबर २०१५ मध्ये केलेल्या विधानाविषयीची माहिती पुढे देत आहोत. हे विधान दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या विधानामुळे त्यांची त्याच वेळी चौकशी करण्यात आली असती, त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध तेव्हाच उघडकीस आले असते.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील विधाने केली होती,

१. मारामार्‍या आणि आक्रमणे हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये. वेळ पडल्यास डाव्या चळवळीकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी अख्खा नक्षलवाद आहे. त्यामुळे ‘सनातन’ने एकदा ही सगळी हिंसा कशासाठी ?, याचे उत्तर द्यावे.

२. समीर गायकवाड यांच्या बचावासाठी प्रयत्न करणार्‍या अधिवक्त्यांच्या संघटनेला आंबेडकर म्हणाले ‘‘आमच्या वाटेला जाल, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’

(प्रकाश आंबेडकर यांची ही विधाने त्यांचा नक्षलवाद्यांशी कसा संबंध असणार, हे दर्शवतात. पोलिसांनी माओवादी तेलतुंबडेच्या पत्रातील नावे असणार्‍यांची चौकशी करतांना प्रकाश आंबडेकर यांच्या या विधानाविषयीही चौकशी करावी आणि त्यांचा नक्षलवाद्यांशी असलेला संबंध उघड करावा, हीच  अपेक्षा !  – संपादक)