पुणे – जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे ५ जुलैला प्रस्थान होणार असून आषाढी वारीसाठी सहस्रो वारकर्यांचा मेळा देहूला आला आहे. प्रथेप्रमाणे मुख्य देऊळवाड्यातून पालखीचे प्रस्थान होईल. अधिक मासामुळे यंदा पालखी सोहळा विलंबाने आहे. विठ्ठलभेटीच्या ओढीने चालणारे हे वैष्णवजन २२ जुलैला पंढरपूर येथे पोहोचतील, तर २७ जुलैला परतीचा प्रवास चालू होईल.