अहेरी विधानसभेची विकासाकडे वाटचाल – पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींचा विकास निधी ..!!

0
1048
Google search engine
Google search engine

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात रस्ते, पूल, आरोग्य, वीज, शिक्षण ह्या क्षेत्रातील विविध विकास कामे प्रगतीपथावर

राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांना प्राधान्य देत ह्या क्षेत्रात गेल्या साडेतीन वर्षात कोट्यवधींचा विकासनिधी खेचून आणला आहे. ह्यामुळे ह्या क्षेत्रातील रस्ते,पूल,आरोग्य,वीज व शैक्षणिक तसेच इतरही समस्या मार्गी लागणार आहेत…!!
राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ना.अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आले. ह्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासकामांना गती मिळण्यास वाव मिळाला. ना. आत्राम यांनी जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळवून दिला. ह्यामुळे नगर पंचायतींच्या विकासनिधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होवून शहरांच्या विकासाला चालना मिळाली, नगर पंचायतींच्या हद्दीत स्वच्छता, हायमास्ट लाईट,पक्के रस्ते आदींसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे, नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा शिफारसीने अहेरी, सिरोंचा, एटापल्ली,भामरागड व मूलचेरा नगर पंचायतीला अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी प्रत्येकी 5 कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे..!!
अहेरी उपविभागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या महिला व बाल रूग्णालयाला अहेरी येथे उभारण्यासाठी मंजूरी मिळाली असून यासाठी शासनाकडून ५८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आदिवासी मुलांना मिळावे म्हणून अहेरी येते एकलव्य विद्यालय साठी २२ कोटी व मोडेल स्कुलच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटी रूपयांचा निधी खेचून आणला आहे, दरवर्षी पावसाळ्यात अनेक दिवस मार्ग बंद करणाऱ्या अहेरी जवळील गडअहेरी नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यामुळे नागरिकांची पावसाळ्याच्या दिवसातील समस्या दूर होणार आहे…!!

आलापल्ली – नागेपल्ली येथील पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला,आलापल्ली आणि सिरोंचा येथे सर्व सोयी – सुविधायुक्त बसस्थानकांच्या निर्मितीसाठी प्रत्येकी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. तसेच अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतींना ८५ लाख रूपये किमतीची अग्नीशमन वाहने उपलब्ध करून दिले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अहेरी विधानसभा क्षेत्रातील ५ ही तालुक्यात अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात १५० ते २०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला असून अनेक रस्ते व पुलाचे कामे प्रगतीपथावर सुरू आहेत..!!
आलापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारत बांधकामासाठी ७ कोटी, सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी ४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. या कामाचा शुभारंभ सुध्दा करण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पाठपुराव्यामुळे आलापल्ली येथील ६६ केव्ही विद्युत उपकेंद्राचे १३२ केव्ही उपकेंद्रामध्ये रूपांतरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तसेच लगाम येते ३३ केव्ही सब स्टेशनचे काम पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी नवीन ३३ केवीचे सबस्टेशन होत आहे ह्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यापासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे…!!