कोणत्याही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी अन्य कागदपत्रांचा वापर करावा, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे…
काही शाळांमध्ये आधार कार्ड नसेल, तर प्रवेश नाकारला जात आहे, असे निदर्शनास आल्यामुळे यूआयडीआयने केले स्पष्ट.
तशा आशयाचे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिवालयांकडेही पाठवण्यात आले आहे.
शाळांनी स्थानिक बँका, टपाल कार्यालये, राज्य शैक्षणिक विभाग आणि जिल्हा व्यवस्थापनाशी समन्वय साधून आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डाचे नूतनीकरण करण्यासाठी मदत करावी, अशी यूआयडीएआयने दिली सूचना.