कविता
—————————————
आभाळ
—————————————
पावसा रिमझिम केलास
हिरवा डोंगर दिलास
पिकाला सुकवून गेलास
डोळं आभाळाकडं लावलास
तिकडं मनसोक्त कोसळलास
इकडे पाठ फीरवलास
दुष्काळात लोटू नकोस
सूड उगावू नकोस
तुझ्या न येण्यानं
आमचं हारवलं जगनं
सततच्या दुष्काळानं आमचं
जनू मोडलं कंबरडच
तुझ्या वांझुट्या रंगाला
तुझ्या पांढ—या मनाला
पांन्हा फुटेल का ?
भेगा बुजवशील का?
आता तरी बरस
जीव झालाया तरस
पाण्यासाठी जीव टांगणीला
सततचा दुष्काळ नशिबाला …!
—————————————
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
——————————————