काही तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी नदीप्रदूषणाच्या नावाखाली अमोनियम बायकार्बोनेट मिसळलेल्या कृत्रिम हौदांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देतात आणि प्रशासनही त्यानुसार कृती करते. मुळातच असे करणे धर्मशास्त्रविरोधी आहे. धर्मशास्त्रांत ‘श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली असावी, तसेच तिचे आणि निर्माल्याचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ आणि
वर्षभरात शहरातील अब्जावधी लिटर अतिदूषित सांडपाणी नदी–नाल्यांत सोडले जात असतांना त्याविषयी निष्क्र्रिय असणार्या महानगरपालिका, तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी गणेशोत्सव आल्यावर मात्र प्रदूषण रोखण्यासाठी सक्रिय होतात.गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण असे विचित्र समीकरण मांडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हितसंबंधांतून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहे. या हौदांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून महापालिका नंतर त्या घनकचरा विभागाच्या गाडीतून नेऊन पुन्हा नदीच्या पात्रातच फेकत असल्याचे पुण्यातील विविध प्रसिद्धीमाध्यमांनी छायाचित्रासह उघड केले आहे. सध्या प्रशासन चालवत असलेल्या अशास्त्रीय मूर्ती विसर्जन करण्याच्या भूमिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्रत्यक्षात पर्यावरणाची हानी ज्या गोष्टींमुळे होते, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे. नदी स्वच्छतेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही नदीची स्वच्छता केली जात नाही, तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या दिवशी नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात येते; पण प्रशासन त्यावर कृती करत नाही. त्यामुळे नदीमध्ये पाणी साडून धर्मशास्त्राचे आचरण्यास अनुकूलता निर्माण करण्यासाठी जनतेने प्रशासनावर दबाव आणायला हवा.
वैध मार्गाने धर्मशास्त्र सांगणार्या सनातन संस्थेची ‘मीडिया ट्रायल’ करण्याचा प्रयत्न निषेधार्ह !
सनातन संस्था राबवत असलेल्या मोहिमेमध्ये सनातनचे साधक नम्रपणे धर्मशास्त्र सांगून भाविकांचे प्रबोधन करत असतात.साधक निर्माल्य गोळा करून ते नदीमध्ये विसर्जन करण्यासारखी कोणतीही मोहीम राबवत नाहीत. असे असतांना प्रसिद्धीमाध्यमे‘सनातनचे साधक नदीमध्ये विसर्जित करण्यास दबाव आणतात, धमकावतात’, ‘सनातनचे साधक निर्माल्य गोळा करून वहात्या पाण्यात विसर्जन करतात’, अशा खोट्या बातम्या दाखवून सनातनची मानहानी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे चुकीच्या बातम्या दाखवून ‘मीडिया ट्रायल’ घेणे निषेधार्ह आहे.