तिरुपती येथील मंदिरांसह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाही. काही मंदिरांत स्थानिक प्रथा–परंपरेनुसार पोषाखाचे नियम असतात. तसेच गाभार्यात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर सोवळ्यात जावे लागते.त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी आमची भूमिका आहे.
सार्वजनिक जीवनात जगतांनाही अशा नियमांचे पालन करावे लागते. अनेक आस्थापने, कार्यालये येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठीचा विशिष्ट पोषाख (ड्रेस कोड) ठरवून दिलेला असतो. शाळा–महाविद्यालये, पोलीस खाते, रुग्णालये आदी ठिकाणी गणवेश असतो नि विशिष्ट पोशाख असतो. तेथे सर्व नियम पाळले जातात, मग मंदिरांनी असे नियम केल्यास ते पाळण्यासाठी विरोध का केला जात आहे ? केवळ तथाकथित पुरोगामी लोकांकडून धर्माशी संबंधित विषय असल्यानेच हा विरोध केला जात आहे. ज्यांची देवावर श्रद्धा नाही, ते लोक देवाच्या दारी आम्ही कसे जावे, हे आम्ही ठरवू, अशी विधाने करत आहेत. मंदिरात काय असावे, काय असू नये, हे पुरोगाम्यांनी नव्हे, तर धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने ठरवायला हवे.
मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत. तेथील शक्ती, चैतन्य, सात्त्विकता, ऊर्