राष्ट्रवादीला समता परिषदेच्या जिल्हाअध्यक्ष खोत यांची अँलर्जी ????
उस्मानाबाद -उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी भवन येथे अखिल भारतीय समता परिषदेची बैठक आयोजीत केली आहे.या बैठकिला सर्व पदाधिकारी यांच्यासह जिल्हा अध्यक्ष उपस्थीत राहणे महत्वाचे असते मात्र जिल्हाअध्यक्ष आबासाहेब खोत यांना या बैठकी बाबत राष्ट्रवादीच्या मंडळींनी निमंत्रण तर सोडाच पण साधा फोन देखील करण्याचे सौजन्य दाखवले नाही. सदरील समता परिषदेचे जिल्हाअध्यक्ष पद रिक्त आहे कि आबासाहेब खोत यांना राष्ट्रवादीने मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा पदाधिकार्यात सुरु होती.राष्ट्रवादी काँग्रेसने आज पर्यंतच्या इतिहासात समता परिषदेच्या बैठकिचे आयोजन यापूर्वी कधीच केले नव्हते किंवा केल्याचे ऐकविण्यात नाही. जिल्हाअध्यक्ष यांना वगळून बैठक घेण्यामागचे नेमके गौडबंगाल काय यावर पदाधिकार्यासह सर्वसामान्य जनतेत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.