दुष्काळी परिस्थिती अवास्तव उधळपट्टीच्या निषेदार्थ उस्मानाबादेत आप कडून महाआरती

0
1092

दुष्काळी परिस्थिती अवास्तव उधळपट्टीच्या निषेदार्थ आप कडून उस्मानाबादेत महाआरती

उस्मानाबाद – राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे शासन मात्र शेतकरी शेतमजूर पाणी प्रश्नांकडे डोळे झाक करून मुख्यमंत्री चषकवर पैसे खर्च करत आहे त्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने फडणवीस सरकार नसून फसनविस सरकार म्हणत छत्रपती शिवाजी चौकात महाआरती केली राज्यात सध्या महाभयंकर दुष्काळी परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शासन मात्र दुर्लक्ष करून मुख्यमंत्री चषक घेत आहे खेळाला विरोध नाही मात्र अनेक गंभीर प्रश्न असताना केवळ प्रसिद्धीसाठी निरर्थक खर्च होत आहे हाच पैसा दुष्काळी परिस्थिती साठी खर्च करण्याची सद्बुद्धी मिळो यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने महाआरती करण्यात आली