आजपासून नरखेड येथे पानी फाउंडेशन तर्फे कार्यशाळा व भव्य प्रदर्शनीचे आयोजन !  तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रदर्शनी व कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

0
1417
आजपासून नरखेड येथे पानी फाउंडेशन तर्फे कार्यशाळा व प्रदर्शनीचे आयोजन !
तालुक्यातील सर्व नागरिकांनी प्रदर्शनी व कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन !
‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी नरखेड तालुक्याची निवड !
नरखेड तालुका प्रतिनिधी :
अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी नरखेड तालुक्याची निवड करण्यात आली आहे. पाणी फाऊंडेशन महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवीत असून, या वर्षाकरिता पाणी फाऊंडेशनने जवळपास ७६ तालुक्यांची निवड केली आहे. त्यात नरखेड तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देण्यासाठी
३१ डिसेंम्बर ला पंचायत समिती नरखेड येथे सकाळी ११ वाजता कार्य शाळेचे व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे कार्य शाळा संपल्या नंतर प्रदर्शनी सुरू होईल आणि १ जानेवारी ला शाळा, विद्यालय तथा महाविद्यालया करिता प्रदर्शनी सुरू राहील
३१ डिसेंबर व १ जानेवारीला नरखेड पंचायत समिती येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘पाणी फाऊंडेशन’ हे नरखेड तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यातून गाव, तालुका दुष्काळमुक्त करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून तालुक्यातील सर्व गावांना तयारी करावी लागणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान असणार आहे. यात ज्या गावांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांना तात्काळ नाव नोंदणी करून द्यावी लागणार आहे. सिने अभिनेता आमिर खान, किरण राव यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत नरखेड तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. प्रदर्शनीसाठी आयोजित कार्यशाळेस शासकीय अधिकारी पाणी फाउंडेशन ची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत .
वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना राज्य पातळीवरचे पहिले बक्षीस ७५ लाख रुपये, दुसरे बक्षीस ५० लाख रुपये, तिसरे बक्षीस ४० लाख रुपये या शिवाय तालुका पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावास १० लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नरखेड तालुक्यातुन जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवावा आणि आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर जिल्हा प्रशासन व पाणी फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.