उस्मानाबाद / प्रतिनिधी – शुक्रवार दि १८ रोजी उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रांमगृह येथे सोलापूर जिल्हा रहिवासी संघटना आयोजित उस्मानाबाद जिल्ह्यातील पञकार रवींद्र केसकर व विकास उबाळे यांना सन २०१८-१९ च्या आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार उद्योजक नागेशशेठ चव्हाण (पुणे) यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पूष्पगुच्च,ट्राॕफी, लेखणी व डायरी देऊन सन्मानीत करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी उपसरपंच शहाजी वाघ ,प्रमुख पाहुणे तहसीलदार विजयकुमार राऊत,प्रहार संघटना जिल्ह्याअध्यक्ष मयुर काकडे ,संदीप इंगळे, रणजित साळुंके,रावसाहेब लोंढे ,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दलित मित्र राज्यशासन पुरस्कार विजेते प्रशांत भालशांकर यांनी केले.