अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी दिली शाहिदाना श्रद्धांजली
५००फुटाच्या अखंड तिरंगा रैली चे आयोजन
शशिकांत निचत :-अमरावती
पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सेनेतील जवान शहीद झाल्यानंतर देशभरात त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना दि.२३ फ्रेब्रुवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शहिदांच्या सन्मानार्थ ५00 फुटाचा अखंड तिरंगा घेऊन स्थानिक दसरा मैदान येथून भव्य रॅली काढण्यात आली.
विशेष म्हणजे ५00 फूट तिरंग्याला सन्मानाने नमन करतांना अमरावती करांचेही डोळे पाणावले होते.आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सेनेच्या जवानांच्या सन्मानार्थ देशात सर्वत्र शहीदांना र्शध्दांजली अर्पण करण्यात येत असतांना अभाविप च्यावीने २३ फेब्रुवारी दसरा मैदान येथून शहरातील प्रमुख भागामधुन ५00 फुटांच्या अखंड आणि विशाल तिरंग्याला घेवून शहिदांना नमन करण्यात आले. या भव्य रॅलीदरम्यान अमरावती वासीयांनी तिरंग्याला नमन करीत शहिदांना सुध्दा र्शध्दांजली अर्पण केली.