बल्लारशहा:- पत्नी आपल्या 2 चिमुकल्या मुलींना व पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. यामुळे तणावग्रस्त पतीने दोन चिमुकल्या मुलींना सोबत घेऊन गळफास लावून नंतर स्वतःही गळफास घेवून आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलींचा गळफास लावलेला फोटो त्याने पत्नीच्या व्हाट्सॲपवरसुध्दा टाकला. सदर घटना रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. श्री रूषीकांत कडूपले (४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने 5 आणि 2 वर्षीय मुलींची सुध्दा हत्या केली.
प्राप्त माहितीनुसार रूषीकांत हा आपली पत्नी व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वार्डातील जय भिम चौक परिसरात राहत होता.
फोटो – फेसबुक