सांगली जिल्ह्यातील
वांगी (ता.कडेगाव)येथे उपसरपंच निवडीबाबत सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. उपसरपंच पदाबाबत जी बातमी आली आहे. ती पूर्ण पणे खोट्या माहिती वर आधारित आहे. सदरचे व्रत खोडसाळपणाने दिले गेले आहे.
येथील उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. ते चांगल्याप्रकारे काम करत आहेत. गावात मोठ्याप्रमाणात विकास कामे करण्यासाठी बाबासाहेब सूर्यवंशी प्रयत्नशील आहेत. असे असताना त्यांच्याबाबत त्यांना ऐनकेन प्रकारे बदनाम करण्यासाठी राजेंद्र पाटील यांच्या खोडसळपणामुळे खोट्या प्रकारच्या बातमी प्रसिद्ध केली गेली आहे. उपसरपंचपद पद बदलाबाबत कोणत्याही प्रकारचा विषय नाही.
Home ताज्या घडामोडी *वांगी येथील उपसरपंच बदलाची चर्चा निरर्थक : राजीनामा देण्याचे व्रत खोट्या माहितीवर...