सायकल रॅलीतून शिक्षकांनी दिला मतदानाचा संदेश – जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रेट वर्क चा अभिप्राय : रॅलीमध्ये बाराशे शिक्षकांचा सहभाग

0
601
अमरावती –
लोकसभा निवडणुकीच्या जनजागृती करिता शिक्षण विभाग व गणेशदास राठी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ एप्रिल ला  अमरावती शहरात सायकल व  बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल  रॅलीला हिरवी झेंडी देतांना शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या नवीन उपक्रमासंदर्भात यांनी कौतुक करत स्वाक्षरी फलकावर ग्रेट वर्क म्हणून सन्मानित केले. यावेळी  शहरातील सुमारे बाराशे शिक्षकांनी सहभाग नोंदविला .
गत एक महिन्यापासून माध्यमिक शिक्षण विभाग मार्फत मतदानाची गुढी,पथनाट्य,बोलक्या बाहुल्या, हायड्रोजन बलून,मानवी साखळी ,रांगोळी,चित्रकला स्पर्धा आदी विविध उपक्रमाद्वारे मतदानाची जनजागृतीकार्य करत आहे. आज पुन्हा शहरात सायकल व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.सकाळी सात ला उपस्थित असलेल्या हजारो शिक्षकांना बघून जिल्हाधिकारी यांना आश्चर्य वाटले.यापूर्वीचे उपक्रम तथा आजचा उत्साह बघून तिथे तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरी फलकावर त्यांनी ग्रेट वर्क म्हणून आपला अभिप्राय नोंदविला.यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी नीलिमा टाके, श्री गणेशदास राठी शिक्षण संस्थेचे सचिव नंदकिशोर कलंत्री, सहसचिव डॉक्टर गोविंद लाहोटी,मुख्याध्यापक एस एस पाचंगे,सहायक नोडल अधिकारी वीरेंद्र रोडे,श्रीनाथ वानखडे,ज्ञानेश्वर टाले,व मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सकाळी साडेसातला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्ते रॅलीला हिरवी झेंडी देण्यात आली.या रलीने शहरातील विद्यापीठ,साईनगर,नवसारी,दस्तूर नगर व नागपुरी गेट आदी प्रमुख रस्त्यांवर मार्गक्रमण करण्यात आले.शिवाजी बीट,समर्थ बीट,संत कंवरराम बीट ,रामकृष्णबीट  व अमरावती ग्रामीण आदी बीटमधील सुमारे १२०० शिक्षक सहभागी झाले होते.यावेळी श्री पुरसानी,श्री श्रीनाथ,श्री नानोटे, सुफी सर,श्री हगवने आदींनी रॅलीचे नेतृत्व केले.या कार्यक्रमाचे संचालन नीता मुंगळा,आभार मीना शर्मा यांनी मानले. यावेळी मतदान जनजागृती करिता निरज देशमुख व सहकार्यांनी मतदान संदर्भात उत्कृष्ट गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.डोक्यात टोपी आणि गाडीवर गो वोटिंग चा लोगो ने सर्व परिसर जनजागृती च्या वातावरणाने भारलेला होता. विविध शाळांनी दुचाकी चालकांसाठी शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.रॅलीचा समारोप राठी विद्यालय येथे पसायदान ने करण्यात आला.