घुईखेड ते पंढरपुर पायदळ वारीचे प्रस्थान – संत बेंडोजी बाबा पालखीची १३० वर्षांची परंपरा, १५ जुलै ला पंढरपुरला पोहोचणार

0
570
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (shaheajd Khan )
आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. आषाढी पौर्णिमा पायदळ वारीेचे आयोजन तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असुन ही वारी चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन अंगावर फुले झेलल्यासारखी झेलत पंढरीसाठी शेकडो भावीकासह ३१ मे शुक्रवारी रवाना झाली आहे. ही दिंडी १५ जुलै ला पंढरपुर येथे पोहोचणार आहे.
            यामध्ये सर्वप्रथम श्री. बेंडोजी महाराज यांच्या पादुकांचे जलाभिषेक मंदिराचे ट्रस्टी दिनकरराव घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रविण घुईखेडकर, बाळासाहेब देशमुख, प्रशांत घुईखेडकर यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर नित्य- नियमानुसार गावातील चंद्रभागा नदीकडे दिंडी प्रस्थान करीता मार्गास्त झाले. लाखो भावीकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. संत बेंडोजी महाराज (संजीवनी समाधी) यांच्या ४७ दिवसाच्या पायी दिंडीमध्ये घुईखेडसह आजुबाजुच्या गावांतील भाविक घरदार, संसार, सुख-दु:ख, दुखणे, आजारपण सर्व विसरून सामील झाले. शेकडो वारकरी कोणाच्याही पत्राची, आमंत्रणाची वाट न पाहता सर्व कामे बाजूला ठेवून किंवा पूर्ण करून वारीला निघण्यास तयार झाले होते. कशाचीही काळजी, चिंता न बाळगता सर्व त्या माउलीवर सोपवून आषाढ महिन्यात तयार होऊन निघाले. भाविक घुईखेड येथुन प्रस्थानापासून ते पंढरीपर्यंत चालत सतत त्या माउलीचे नाव घेत भजन, कीर्तन करत वारीत सामील झाले. अगदी मोकळ हवेतून चालत, घाटातून चालत, मोकळ रानातून, दाट झाडीतून, मजल दरमजल करत भाविक निघाले. निसर्गाचा पुरेपूर आनंद वारीत सतत घेतात. नवीन माणसे, नवीन ओळखी, नव कला अनुभवाला मिळतात. भाविकांच्या संपूर्ण शरीराची या वारीमुळे सर्व्हिसिंग होते.
      श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील श्री. ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकुन २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणुन श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे. व या रथामागे विदर्भ प्रांतातुन जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान हे १३३७ चे असुन सदर वास्तु ही अतिशय प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवितो. या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा ही एकुन १३०  वर्षापासुन चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकामध्येही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरतपणे यशस्वापणे पार पडत आहे. ३१ मे रोजी घुईखेड येथुन निघालेली दिंडी १२ जुन रोजी पैठण येथे पोहोचणार आहे. १३ जुन रोजी पैठणवरून निघून २४ जुन रोजी आळंदीला पोहोचणार आहे व २५ जुन रोजी आळंदीवरून निघून १५ जुलै रोजी पंढरपूर पोहोचणार  आहे. या  दरम्यान अनेक गावात दिंडीच्या थांबण्याची, नाश्ता, चहा व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १६ जुलैला विनेकरांचे  पंढरपूर  काल्यानंतर  पुन्हा  परतीच्या प्रवासाकरीता दिंडीचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यामध्ये अभिजित काकडे, रितेश कोरडे, प्रतीक येवले, शुभम येवले, अजिंक्य शिलांकर, वैभव काकडे, वैभव गावंडे, जयेश नागपुरे, गौरव इंगोले, प्रथमेश गिरी, प्रफुल घड्डीनकर, प्रतीक काकडे, पांडुरंग भोयर, विश्वेश्वर गावंडे, जयकृष्ण जेवडे, किशोर येवले, संजय चनेकार, काशिनाथ लाड, तुळशीराम वैद्य, बंडु बनकर, मनोहर कोल्हे परिसरातील सह शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते.