तमिळनाडूतील हिंदूंच्या हत्यांविषयी कमल हसन गप्प का ? – जी. राधाकृष्णन्, राज्य अध्यक्ष, शिवसेना, चेन्नई, तमिळनाडू

0
1082
Google search engine
Google search engine

रामनाथी (गोवा) – नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला हिंदु आतंकवादी होता’असे विधान अभिनेते कमल हसन यांनी केले.तमिळनाडूत 100 हून अधिक हिंदूंच्या जिहादी कट्टरतावाद्यांनी हत्या केल्यातसेच श्रीलंकेत हिंदूंच्या हत्या होत आहेतपण याविषयी बोलण्याचे धाडस कमल हसन करत नाहीत अशा प्रवृत्तींचा हिंदूंनी धिक्कार केला पाहिजेहिंदूंनी संघटित होऊन सदर वक्तव्याचा तीव्र विरोध केल्यावर कमल हासन यांना ‘माझी मुलगीही हिंदु धर्मातील तत्त्वांचा अभ्यास करते’असे वक्तव्य करावे लागलेअसे प्रतिपादन तमिळनाडू येथील शिवसेनेचे राज्य अध्यक्ष श्रीजीराधाकृष्णन् यांनी येथे केलेते 31 मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तिसर्‍या दिवशी ‘विविध राज्यांतील हिंदूंच्या दुर्दशेची सद्य:स्थिती’ या परिसंवादात ‘तमिळनाडू राज्यात वाढत्या हिंदूविरोधी विचारधारेचे स्वरूप आणि उपाययोजना’ या विषयावर ते बोलत होते.

बंगालमधील परिवर्तन हे आध्यात्मिक शक्तीमुळेच ! – डॉशिबनारायण सेनसंपादक, ‘ट्रुथ’ नियतकालिक

    या वेळी बंगाल येथील ‘ट्रुथ’ नियतकालिकाचे संपादक आणि ‘शास्त्रधर्म प्रचार सभे’चे सदस्य डॉशिबनारायण सेन म्हणाले, ‘‘बंगालमधील हिंदूंना जगणेही कठीण बनले आहेया स्थितीत बंगालमध्ये होत असलेले विद्यमान राजकीय परिवर्तन हे आध्यात्मिक शक्तीमुळेच होत आहे.राजकीय व्यक्ती हे मान्य करणार नाहीतमात्र वास्तविक कारण तेच आहे.’’ आसाम येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या श्रीमती राणु बोराह म्हणाल्या, ‘‘बांगलादेशातून धर्मांध मोठ्या प्रमाणात आसाम राज्यात येत आहेतआसाममधील जिल्हे धर्मांधबहुल झाले असून त्यांची संख्या 80टक्क्यांपेक्षा अधिक आहे.’’

लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृती आवश्यक ! – विनोदकुमार सर्वोदयअध्यक्षसांस्कृतिक गौरव संस्थानगाझियाबाद

      देशात जिहाद्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात आले आहेइस्लामी देशांमधून शिष्यवृत्ती घेऊन धर्मांध विद्यार्थी भारतात येतात आणि येथील हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसवतातया विषयी मोठी जागृती करण्याची आवश्यकता आहेअसे मनोगत उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील सांस्कृतिक गौरव संस्थानचे अध्यक्ष श्रीविनोदकुमार सर्वोदय यांनी व्यक्त केलेते ‘हिंदु राष्ट्र कार्य’ या सत्रात बोलत होतेया वेळी छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्वाभिमानी पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री अधिवक्ता सतीश त्रिपाठी म्हणाले, ‘‘देशात ज्या भागात जातीवर आधारित राजकारण केले गेलेतेथे आपली जातीव्यवस्था कमकुवत करण्याचे काम झालेप्राचीन ग्रामव्यवस्थेत वर्णाश्रमव्यवस्था अंतर्भूत असल्याने ती आदर्श होतीया व्यवस्थेमध्ये प्रत्येक जण दुसर्‍याची काळजी घेत असल्याने ती स्वावलंबी होती.’’ या सत्रात हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि उत्तरपूर्व भारत मार्गदर्शक पूनीलेश सिंगबाळ यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्रजागरण आणि हिंदूसंघटन’ यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा मांडला.सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व आणि सामूहिक योजनेची दिशा’ यांवर मार्गदर्शन केले