चांदूर रेल्वे – शहेजाद खान
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी प्रमाणे यंदाही समतादूत वृक्षारोपण सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या समतादूत वृक्षारोपण सप्ताह निमित्त चांदूर रेल्वे तालुक्यातील समतादूत सलीम खान खलील खान पठाण यांनी तालुक्यातील निमगव्हाण येथील स्मशानभूमी येथे वृक्षारोपण केले. या आठवडाभर १५ जुलै ते २१ जुलै पर्यंत वेगवेगळ्या गावात, विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असुन यामध्ये मुस्लिम कब्रस्थान, रुग्णालये, शाळा, कॉलेज, वसतिगृह, निवासी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय याचा समावेश आहे. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच सौ. मीनाताई कडव, ग्रामसेवक शिवरकर, अंगणवाडी सेविका इंगळे, गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदी उपस्थित होते. सदर सर्व कार्यक्रम बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, संचालिका प्रज्ञा वाघमारे, राहुल कराले, विजय वानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.