तिसऱ्या दिवशीही निलेश विश्वकर्मा यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

0
1001
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे तालुक्यातील नागरिकांचा घेतला आशिर्वाद
युवकांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण 
चांदूर रेल्वे – Shahajad Khan :- 
    युवा नेते निलेश विश्वकर्मा यांच्या आशिर्वाद यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला सोमवारपासुन सुरूवात झाली असतांना यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी निलेश विश्वकर्मा यांनी नागरिकांच्या समस्या ऐकल्या असुन नागरिकांचे आशिर्वाद घेतले. या यात्रेमुळे युवकांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण चांदूर रेल्वे तालुक्यात पहावयास मिळत आहे.
      चांदूर रेल्वे शहरातील युवा नेते निलेश विश्वकर्मा यांच्या परिचय व आशिर्वाद यात्रेला आज ११ जुलैपासुन सुरूवात झाली. अशातच मंगळवारी रात्री सुलतानपूर, बेलोरा, धामक या गावांना भेट देऊन बुधवारी सकाळपासुन ते रात्रीपर्यंत सोनगाव, कळमजापुर, कळमजापुर (झोपडपट्टी), कळमगाव, कळमगाव(झोपडपट्टी), सातेफळ या गावांना भेटी देऊन नागरिकांशी हितगुज केले. नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचे नक्कीच निराकरण करण्याचे आश्वासन निलेश विश्वकर्मा यांनी दिले व प्रत्येक गावात नागरिकांचे आशिर्वाद घेऊन यात्रेच्या पुढील प्रवासाकरिता प्रस्थान केले.