भर पावसात निलेश विश्वकर्मा यांच्या यात्रेला धामणगाव रेल्वे तालुक्यात सुरूवात – नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

0
623
धामणगाव रेल्वे –
    धामणगाव रेल्वे तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असता अनेकजण घराबाहेर पडणेही टाळत आहे. परंतु अशाही स्थितीत जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यात “आशिर्वाद यात्रेला” सुरूवात केली असुन यामध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
     धामणगाव रेल्वे मतदार संघातील तीनही तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकुन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी व नागरिकांचा आशिर्वाद घेण्यासाठी ११ जुलैपासुन युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी  आशिर्वाद यात्रेला सुरूवात केली होती. दोन तालुक्यात अभुतपुर्व प्रतिसादानंतर आता या यात्रेने धामणगाव रेल्वे तालुक्यात प्रवेश केला आहे. तालुक्यातील गव्हा फरकाडे, गव्हा निपानी, ढाकूलगाव, पिंपळखुटा, चिंचपुर, अंजनवती, अंजनसिंगी, अशोकनगर, अशोकनगर (झोपडपट्टी) आदी गाव भ्रमण करून नागरिकांशी दिलखुलास चर्चा केली. तर अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन सुध्दा दिले. प्रत्येक गावात निलेश विश्वकर्मा येणार असल्याची वार्ता पसरताच नागरिक अक्षरश: वाट बघत होते. गावांगावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  गावांतील धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेतले. पुढील तीन दिवस ही यात्रा धामणगाव तालुक्यातील इतर गावांत जाणार आहे. या यात्रेमुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात आतापासुनच विधानसभा सारखे माहोल तयार झाल्याचे चित्र आहे.