कश्मिरवरील निर्णयाचा आकोटात जल्लोष !

0
850

 

आकोटःप्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वातील केन्द्रातील भा.ज.पा.सरकारने कश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याविषयी राज्यसभेत मंजुरात मिळवली.अन या ऐतहासीक निर्णयाचे आकोट येथील भा.ज.पा.कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करुन व पेढे वाटुन आनंदत्सोव साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रातील भा.ज.पा.सरकारने कश्मीर बाबत विवादीत ३७०व इतर कलम रद्द करण्याचा ऐतहासीक निर्णय घेतल्याची माहीती मिळताच भा.ज.पा. कार्यकर्ते स्थानिक शिवाजी चौक येथे एकञीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंञी अमीत शहा यांचे नावाने जयघोष करीत त्यांचे अभीनंदन केले. तसेच पेढे वाटुन फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला यामध्ये नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, जयप्रकाश पांडे,राजेश नागमते, पुरुषोत्तम चौखंडे, न.प. उपाध्यक्ष अबरार खाँ. तालुका अध्यक्ष राजेश रावणकर, संतोष झुनझुनवाल, डॉ. गजानन महल्ले, अरुण जवंजाळ,योगेश नाठे श्रीकृष्ण वावगे,हरीष टावरी,नगरसेवक मंगेश लोणकर, मंगेश चिखले, यांचेसह अँड.अतुल सोनखासकर,अनिरुध्द देशपांडे महादेव रेखाते,जितुकुमार जेसवानी,मनोज चंदन,चेतन मर्दाने, रविंन्द्र केवटी,विलास बोडखे, उमेश पवार,दिनेश नागमते,उमेश बहाकार, श्रीकृष्ण आष्टिकर, संदिप पाटील, गोपाल रावणकर,मारोती शिवरकर,मुन्ना ठाकुर, गोपाल माकोडे ,उमर पटेल, दिलीप मजेठीया श्रीकृष्ण उबाळे यांचेसह भा.जपा. कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.