15 वर्ष मला जर भेटले पायाला माती लागू देणार नाही:-बबलू देशमुख चांदुर बाजार येथील प्रचार दरम्यान व्यक्तव्य

0
919
Google search engine
Google search engine

15 वर्ष मला जर भेटले पायाला माती लागू देणार नाही:-बबलू देशमुख

चांदुर बाजार येथील प्रचार दरम्यान व्यक्तव्य

चांदुर बाजार:-

जनतेने जर मला 15 वर्ष पर्यत जनतेने संधी दिली तर मी मतदार संघात जनतेच्या पायाला मातीही लागू देणार नाही. असे व्यक्तव्य महाआघाडी चे अचलपुर मतदार संघाचे उमेदवार बबलू देशमुख यांनी स्थानिक नेताजी चौकतील प्रचार सभे दरम्यान केले.

सध्या अचलपुर मतदार संघात दुहेरी लढत होत असल्याचे संकेत असले तरी 15 वर्ष पासून या मतदारसंघात अनेक प्रकारचे मोर्चे, आसूड मोर्चा,अनेक आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू याचा विरोधात कॉग्रेस पक्षाचे उमेदवार बबलू देशमुख याची लढत आहे.बबलू देशमुख यांना माजी राज्य मंत्री वसुधाताई देशमुख, माजी जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे ,मागील विधानसभा वेळी निवडणूक रिगणात असलेलं रफिक शेठ यांनी पाठींबा दिला .त्यामुळे आमदार बच्चू कडू याच्या समोर आव्हान राहणार हे मात्र खरे तर सर्वाधिक अचलपुर मतदार संघातील धरणे हे कॉग्रेस च्या काळात आले असल्याचे बबलू देशमुख यांनी म्हटले आहे.

तिकडे प्रहार पक्ष चे आमदार बच्चू कडू हे चौफर टीका करीत आहे.त्यात त्यांनी भाजप,सेना, कॉग्रेस राष्ट्रवादी यांना टीकास्त्र उगरले आहे.तर बबलू देशमुख हे अचलपुर मतदार संघात शिवसेना पक्षला उमेदवारी दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी आपले काम करतील या आशेने भाजपा किंवा शिवसेना युती सरकार वर प्रचार सभे दरम्यान कोठेही टीका किंवा आवाज उठवला नाही.त्यामुळे भाजपा गड मध्ये कॉग्रेस सरचड होनार का हा प्रश्न आहे.

मतदार संघात मी सावकारी करत असेल तर माझ्या वर इडीची कार्यवाही का केली नाही आणि मी जर आमदार झाले तर आमदार ला अटक करू हे बबलू देशमुख नेताजी चौकतील सभेदरम्यान यांनी म्हटले आहे.

फोटो:-
प्रचार सभेदरम्यान बोलताना बबलू देशमुख