काल संध्याकाळपर्यंत भाजपचे नेते सरकार आमचेच येणार, मुख्यमंत्री आमचाच होणार, असे सांगत होते. आम्ही त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, आता तेच मागे हटले आहेत. भाजप सरकार स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार. तसेच भाजपने शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षांचा करार पाळायलाही नकार दिला. मग भाजपचा अट्टाहास नेमका कशासाठी होता, असा सवाल यावेळी राऊत यांनी विचारला.