मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आकोट भेट
आकोटः ता.प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचीत राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच आकोट- तेल्हारा जिल्हापरीषद व पंचायत समीत निवडणुक प्रचारार्थ 2 दिवशीय झंझावाती प्रचार दौरा व सभा झाल्यात.दि.1 जानेवारी रोजी आकोटमधे शिवाजी काॅलेज येथे जल्लोशात स्वागत करन्यात आले व तदनंतर 1जानेवारी 2 जानेवारी रोजी मुकामी राहून प्रहार जनशक्ती पक्ष व शिवसेना युतीचा उमेदवारांनसाठी अनेक सभा घेतल्या. मुंडगांव सर्कल , पाथर्डी सर्कल ,हिवरखेड सर्कल,अकोली जहा.सर्कल,वरूड सर्कल,कुटासा सर्कल,चोहोट्टा सर्कल व म्हैसांग अशा जवळपास 9 सभा झाल्या…सभे मधे बच्चूभाऊंनी… मा.मुख्यमंत्रीसाहेबांनी केलेली शेतकर्यांची कर्जमाफी बाबत शेतकर्यांनमधे असलेला सभ्रम दुर करत…कर्जमाफी कीती पारदर्शक आहे हे सांगत विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले….आणी प्रहार व शिवसेना युतीचा उमेदवारांना भरगोस मताधीक्यांनी विजयी करा असे मतदारांना संबोधीत करत प्रचार दौरा केला…करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर , शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,शिवसेनेच्या महीला जिल्हा संघटीका सौ.मायाताई म्हैसने ,प्रहारचे उपजिल्हा प्रमुख निखील गावंडे , प्रहारचे तालुका अध्यक्ष कुलदीप वसू , तुषार पाचकोर , प्रहारचे आकोटशहर प्रमुख सागर उकंडे , प्रहार युवक ता.अध्यक्ष अविनाश घायसुंदर , राहुल देशमुख व समस्त प्रहार व शिवसेना पदाधीकारी हजर होते….