सांगली/कडेगांव:
महाराष्ट्रतील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी कडेगाव येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार सौ. शैलजा पाटील व नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी आंदोलकांची भेट घेतली. कडेगांव तालुका भाजपाचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी कडेगांव पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती प्रा. आशिष घार्गे ‘ जि. प. सदस्य अँड शांता कनुंजे रेश्मा साळुंखे, दत्ताञय सुर्यवंशी, मंदाताई करांडे, रविंद्र कांबळे हे प्रमुख उपस्थित होते.
श्री. धनंजय देशमुख म्हणाले की, भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱयांची सरसकट फसवणूक करणारी आहे. शेतकर्यांचा सात बारा कोरा कराव व महिलांचे वरील अत्याचार थांबवावेत, यासाठी कायदा व सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सरकारच्या विरोधात आजचे धरणे आंदोलन आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवू असे देशमुख यांनी सांगीतले.
यावेळी बोलताना श्री धनंजय देशमुख पुढे म्हणाले की , गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. अॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे.
यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, संदेश दंडवते, प्रकाश गढळे, पपीता सुतार. रंजना पाटील, कडेगांव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदय देशमुख, नितिन शिंदे, नगरसेवक सौ. अनिता देशमुखे, कृष्णत मोकळे, महेंद्र पवार, संग्राम घार्गे, सुनिल भस्मे, हणमंत थोरात, सतिश जाधव, महेंद्र करांडे, सुरेश यादव, भरत पाटील, पांडुरंग होनमाने, सद्दाम मुल्ला, सुखदेव पवार, महेश देशमुखे, शिवाजीराव पाटील, अशोक साळुंखे, विजय गायकवाड, लक्ष्मण माने, संजय पवार, श्रीपती माने, बापूराव देशमुख, प्रकाश आण्णा शिंदे,धोंडीराम मोहिते, संतोष डांगे, सुरज देशमुख, शिवाजी चन्ने, अँड. मनोज इनामदार, सुधाकर चव्हाण, रविंद्र , राजेंद्र दिक्षीत, जुबेर बागवान, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
_____________________________________.
फोटो ओळ : कडेगांव येथे तहसीलदार शैलजा पाटील यांना भाजपा धरणे आंदोलनाचे वेळी मागण्यांचे निवेदन देताना तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, दत्तात्रय सुर्यवंशी, सभापती मंगल क्षीरसागर व अन्य.
Home ताज्या घडामोडी शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी कडेगांव तालुका भाजपाचा एल्गार : तहसीलदार...