चांदूर रेल्वे:
अमरावती येथून चांदूर रेल्वे कडे येत असलेली स्कुल व्हॅन टाटा मॅजिक (एमएच-एच ९४३३) अचानक पेटल्याची घटना शनिवारच्या रात्री १० वाजता दरम्यान अमरावती ते चांदूर रेल्वे रस्त्यावर चिरोडी गावादरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, चांदूर रेल्वे निवासी संतोष गोवर्धन कडु यांच्या जावई विजय उत्तमराव रोंघे यांच्या मालकीची टाटा मॅजिक (एमएच२७एच९४३३) या गाडीचे अमरावती येथील जयका मोटर्स येथे दुरूस्तीचे काम करून चालक सुरेश भैय्यालाल प्रजापती शनिवारी रात्री १० वाजता परत येत असतांना चिरोडी गावाजवळ अचानक गाडीतुन धुर येतांना दिसला.त्यामूळे त्यांनी त्वरीत गाडी थांबवून खाली उतरून पाहिले असता खाली उभाळ दिसला. त्यांनी बॅटरीचे वाय काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत गाडीने पेट घेतला आणि गाडी जळुन खाक झाली. अग्नीशामक दल व पोलिसाच्या उपस्थितीत रहदारीला अडथळा होवु नये म्हणून लोकांच्या मदतीने रोडच्या बाजुने गाडी ठेवण्यात आली. यामध्ये टाटा मॅजिक जळुन खाक झाल्याने गाडीचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी भादवि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, चांदूर रेल्वे निवासी संतोष गोवर्धन कडु यांच्या जावई विजय उत्तमराव रोंघे यांच्या मालकीची टाटा मॅजिक (एमएच२७एच९४३३) या गाडीचे अमरावती येथील जयका मोटर्स येथे दुरूस्तीचे काम करून चालक सुरेश भैय्यालाल प्रजापती शनिवारी रात्री १० वाजता परत येत असतांना चिरोडी गावाजवळ अचानक गाडीतुन धुर येतांना दिसला.त्यामूळे त्यांनी त्वरीत गाडी थांबवून खाली उतरून पाहिले असता खाली उभाळ दिसला. त्यांनी बॅटरीचे वाय काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत गाडीने पेट घेतला आणि गाडी जळुन खाक झाली. अग्नीशामक दल व पोलिसाच्या उपस्थितीत रहदारीला अडथळा होवु नये म्हणून लोकांच्या मदतीने रोडच्या बाजुने गाडी ठेवण्यात आली. यामध्ये टाटा मॅजिक जळुन खाक झाल्याने गाडीचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी भादवि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.