त्या पळालेल्या ३०० जणावर गुन्हे दाखल

0
431
Google search engine
Google search engine


उस्मानाबाद / प्रतिनीधी

“आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, निवारा गृह सोडले, 3 गुन्हे दाखल.”

उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्यात दि.15.04.2020 रोजी होम कॉरंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)उमेश मारुती नलावडे रा. सरणवाडी, ता. परंडा, तर सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता फिरणारे 2)कृष्णा भानुदास शेळवणे रा. शिवतेजनगर, ता.हवेली, जि.पुणे, तसेच उमरगा येथील निवारा गृहात प्रशासनाने ठेवलेले असतांनाही दि. 14.04.2020 रोजी प्रशासनाचा विरोध करुन हैद्राबादकडे निघुन गेलेल्या सुमारे 300 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 15.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.