पालघर येथे पोलिसांसमोरच दोन संतांचे ‘मॉब लिंचिग’ ही महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना – शासनाने संबंधित पोलिसांसह दोषींवर कठोर कारवाई करावी

0
1296
Google search engine
Google search engine

पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे. यासंदर्भात समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसच त्या वयोवृद्ध संतांना हिंसक जमावाकडे सोपवत असल्याचे आणि पोलिसांच्या समोरच त्यांची निर्घृण हत्या होत असल्याचे भीषण सत्य उघड झाले आहे. जर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारा पोलीसच हत्या करणार्‍यांना साहाय्य करत असेल, तर जनतेने कोणाच्या भरवशावर रहावे ? या आधीही ठाणे येथे पोलिसांनी एका हिंदुत्ववाद्याला त्याच्या घरातून उचलून नेऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली होती. तुकाराम आेंबळे यांच्या बलिदानाने उंचावलेली पोलीसदलाची मान अशा घटनांमुळे कलंकित होऊन खाली जात आहे. संतांची भूमी म्हणवणार्‍या महाराष्ट्राला कलंकित करणार्‍या घटना आहेत. वारंवार हिंदूंना लक्ष्य करणार्‍या या हिंसक घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणार्‍या हिंसक जमावासह, संबंधित पोलिसांवरही ३०२ चा गुन्हा नोंद करावा, तसेच दोषी पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

सरकारने याविषयीची नेमकी माहिती जनतेला द्यायला हवी.  लॉकडाऊनच्या दळणवळण बंदी काळात पालघर येथे शेकडो लोकांचा जमाव रात्रीच्या वेळी जमून लाठी-काठ्यांसह बाहेर येतो काय आणि संत पोलिसांकडे संरक्षणाची विनंती करत असतांना त्यांची निर्घृण हत्या करतो,  हे हादरवून टाकणारे दृश्य  आहे. श्री पंच दशनाम जुना आखाडा हा देशातील १३ आखाड्यांपैकी सर्वांत मोठा आखाडा आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  त्यामुळे सरकारने या प्रकरणी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता,हिंदु जनजागृती समिती यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे