सांगली जिल्ह्यातील इरळी ता.कवठेमहंकाळ येथील सलून कारागीर नवनाथ साळुंखे यांच्या कुटुंबीयांना संवेदना सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर यांचे कडून एक लाख रुपयांची मदत*

Google search engine
Google search engine

*


सांगली जिल्ह्यातील इरळी तालुका कवठेमंकाळ येथील सलून कारागीर नवनाथ साळुंखे यांनी आर्थिक उपासमारीला कंटाळून 10 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला 18 जून रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले . नवनाथ साळुंखे यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्या प्रयत्नातून *संवेदना सोशल फाऊंडेशन कोल्हापूर यांचे वतीने एक लाख रुपयांचा धनादेश आज कडेगाव येथे सुपूर्द करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, संवेदना सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर शहर अध्यक्ष मा. राहुल चिक्कोडे* धनंजय देशमुख, अध्यक्ष भाजपा कडेगाव तालुका, कडेगाव पंचायत समिती उपसभापती प्रा. आशिष घार्गे, नगरसेवक उदय देशमुख, नगरसेवक नितीन शिंदे, संतोष डांगे, सुनील गाढवे *कडेगाव जिल्हा नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष गजानन सपकाळ जिल्हा संघटक सतीश लोखंडे संपर्कप्रमुख रवी पवार जिल्हा सल्लागार विश्वास आप्पा सूर्यवंशी कडेगाव तालुका अध्यक्ष संभाजी जाधव कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष विजय वास्कर प्रवीण सपकाळ नवनाथ शिंदे नाना शिंदे यासह भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ व संवेदना सोशल फाउंडेशन यांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते