बेलाच्या पानाने घेतला मायलेकीचा बळी ; नितळी येथील घटना !

0
2349

बेलाच्या पानाने घेतला मायलेकीचा बळी ; नितळी येथील घटना !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

बेलाचे पान आसरा (देवी) ला वाहण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा विहरीत पडून म्रत्यू झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद तालुक्यातील नितळी शिवारात घडली. हि घटना दि.३१ आँगष्ट २०२० रोजी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील अश्विनी महादेव रोकडे वय २५ (वर्ष ) व त्यांची मुलगी वैष्णवी महादेव रोकडे वय ४ (वर्ष) या दोघी मायलेकी त्यांच्या शेतात गेल्या होत्या. त्यांच्या शेतात विहरीच्या जवळच आसराचे छोटे मंदिर आहे.त्या मंदिरात छोटी मुलगी वैष्णवी हि बेलाचे पान आसराला वाहण्यासाठी गेली असता तीचा तोल जाऊन विहरीत पडली मुलीचा आवाज ऐकून आईचे काळीज भेदरल्याने आईनेही वैष्णवीला वाचवण्यासाठी विहरीत उडी मारली परंतू त्या दोघींनाही पोहता येत नसल्यामुळे दोघींवरही काळाने घाला घातला. त्या दोघींचाही पाण्यात बुडून जागीच म्रत्यू झाला.बराच वेळ झाला म्हणुन मुलगी व तीची आहे या दोघी शेतात गेलेल्या परत आल्या नाहीत म्हणून चिमुकलीचे वडिल महादेव रोकडे हे त्यांच्या शेतात गेले तर त्या दोघी मायलेकी विहरीत पडलेल्या दिसल्याने त्यांनी हि माहिती नातेवाईकांना देऊन त्या दोघींना विहरीच्या बाहेर काढून त्यांचे कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन त्यांच्या नितळी गावात अंत्यविधी रात्री सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.
या घटनेची बेंबळी पोलीस ठाण्यात अकस्मात म्रत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.