अकोटःसंतोष विणके
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला अकोट मधील व्यापारी व नागरिकांचा प्रतिसाद न लाभल्याने पहिल्या दिवशी पुरता फज्जा उडालेला दिसला. दि.25 ते 29 सप्टेंबर दरम्यान जिल्यातील व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. मात्र जनता कर्फ्यूस स्थानिक व्यापाऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने सकाळपासून शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठ दररोज प्रमाणे उघडी होती.त्यामुळे आदल्या दिवशी भीतीपोटी अनेकांनी केलेल्या अवास्तव खरेदीने सामान्य माणूस नाडला गेला. तर नफेखोरांचे भले झाल्याची सर्वसामान्यत चर्चा होती. त्यामुळे जीव मोठा कि नफा मोठा या गणितात नफ्याचाच बोलबाला दिसला.मात्र जनता कर्फ्युच्या भीतीचा सर्वाधिक फटका गरीब हातमजुरी करणाऱ्यांना बसल्याने या विचित्र परिस्थितीस जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे