#वर्धा, दि 1 :- संचार बंदीत शासनाचे आदेश धुडकावत मास्क न घालणा-या 612 नागरिकांवर काल प्रशासनाने कडक कारवाई करीत 1 लाख 34 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई प्रशासनाच्या धडक पथकाने वर्धा जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांवर केली आहे.
कारवाई सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 हजार 899 नागरिकांकडून 5 लाख 93 हजार 214 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स, बाजारपेठा, व्यायामशाळा, रेस्टरॉं, दुकाने, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकांणी कोविड नियमांचे पालन न करणा-यांवर केलेल्या कारवाईत 3 लाख 55 हजार 563 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
#MaskUp #mask #wardha_district #wardhafightscorona #fine